Total Pageviews

Wednesday 15 February 2017

सद्गुरुंच्या शोधात

सद्गुरुंच्या शोधात



एक प्रसिद्ध सुफी गोष्ट आहे :
एका गावातला एक तरुण सद्गुरुंच्या शोधात निघाला .त्याची सद्गुरू मिळवण्या साठी जगभरत कुठेही  फिरण्याची तयारी होती , पण  ते सद्गुरू खरोखर ब्रम्हज्ञानी असावे , खरे सद्गुरू असावे असे त्याला वाटे अश्या सद्गुरुंना  शोधण्यासाठी  त्याने निश्चय केला.
बाहेर त्याच्या गावात एक  वृध्द, झाडाखाली बसून असलेले त्याने पहिले होते . त्याने त्यांची  भेट घेतली   तो त्या वुद्ध  माणसाला म्हणाला, " आपण कधीही आपल्या आयुष्यभर ऐकले आहे का ? आपण तर एक भटके  दिसता ..."
तो वृद्ध त्या तरुणास उद्देशून महालाला  " हो मी एक भटका आहे. मी सर्व पृथ्वीवर भटकंती केली आहे .".
तो तरुण त्या वृद्धास म्हणाला " मग तू योग्य व्यक्ती  आहेस . तू मला सूचित करू शकतोस मी जावे कुठे? मी एक परिपूर्ण गुरूंच्या शोधात आहे   एक शिष्य होऊ इच्छितो.
म्हाताऱ्या माणसाने  त्याला काही पत्ते सुचविले, आणि तो तरुण  त्याचे आभार मानून  आपल्या मार्गाने गेला.
३० वर्षे लोटली . ३० वर्षांच्या ह्या भटकंतीत त्याच्या अपेक्षा पूर्ण करील अशी कोणतीही व्यक्ती त्याला सापडली नाही . उदास आणि हताश , तो आपल्या गावी परतला . ज्या क्षणी तो त्याच्या गावात प्रवेश करत होता तेव्हा त्याची नजर एका वृक्षांतर्गत बसलेल्या म्हाताऱ्या माणसावर पडली  तो आता फारच  म्हातारा झाला होता. आणि अचानक त्याने आपल्या सद्गुरुंना ओळखले .धावतच तो त्यांच्या पायाशी नतमस्तक झाला व म्हणाला " स्वामी आपण मला तेव्हाच का नाही सांगितले कि आपणच ते माझे सद्गुरू आहांत ज्यांना मी गेली ३० वर्षे संपूर्ण पृथ्वी भ्रमंती करून शोधात होतो?
म्हातारा माणूस म्हणाला, "पण तेव्हा ती वेळ आली नव्हती . तू मला ओळखू शकला नाहीस . तुला  काही अनुभव आवश्यक होता ." पृथ्वी भ्रमंती ने तुझ्यात एक विशिष्ट परिपक्वता, एक विशिष्ट समजून आली आहे.

आता तू मला पाहू शकतोस. गेल्या वेळी  जेव्हा आपण भेटलो , तू मला पाहिले नव्हते मी फक्त तुला दिसलो .ह्यात फरक आहे .तू  मला परिपूर्ण गुरुं बद्दल विचारणा केली हाच पुरेसा पुरावा होता  की, तू मला पाहू शकत नाही. की, तुला माझ्या उपस्थितीची जाणीव नाही.तुला माझा सुगंध जाणवत नाही. तू  पूर्णपणे आंधळा होतास ; त्यामुळे मी तुला जाऊ दिले. म्हणून मी तुला चुकीचे पत्ते दिले व भ्रमंती वर धाडले .काय आहे की कधी कधी चुकीच्या लोकांत राहून सुद्धा चांगले शिकायला मिळते !ज्या क्षणी तू गुरूच्या शोधात माझा कडे पाठ फिरवून निघालास , त्या क्षण पासून गेली ३० वर्षे मी तुझी इथेच वाट पाहत बसलो आहे. मी हा वृक्ष सोडला नाही. तो तरुणही काही आता तरुण राहिला नव्हता .त्याने त्या वृक्षाकडे एकदा आश्चर्याने  चमकून पहिले कारण , तो तोच वृक्ष होता जो गुरूंच्या शोधात निघण्या पूर्वी त्याला स्वप्नात दिसत असे व त्याला नेहमी वाटे की त्याचे सद्गुरू त्याला असेच वृक्षाखाली भेटतील .पण गेल्या वेळी त्याला तो वृक्ष दिसला नाही , ना त्याचे सद्गुरू !! कारण तेहवा गुरु ही फक्त त्याच्या साठी एक कल्पनाच होती व तो त्या कल्पनेतच रमला होता . सर्व काही तिथेच होते , आज जसे आहे तसे , त्याच्यासाठीच , अगदी तयार . पण तो मात्र तेव्हा तयार नव्हता .
 
Osho – “Guida Spirituale”

No comments:

Post a Comment