Total Pageviews

Wednesday 30 April 2014

श्रद्धा आणी तिचे महत्व






अश्रद्धया हुतं दत्तं तपस्तप्तं कृतं यत I
असदित्युच्यते पार्थ तत्प्रेत्य नो इह II  . गि . १७-२८
 


हे पार्थ , अश्रद्धेने केलेले हवन ,दिलेले दान , आचरलेले तप केलेले जे कर्म असेल त्याला सत असे म्हणतात . हे सत या लोकी परलोकीही लाभदायक नाही . म्हणून भगवंताला अर्पण करताना नितांत श्रद्धेची आवश्यकता आहे .

खूप पूर्वी एकदा भारतात मोठा दुष्काळ पडला होता . एक गाव जे पूर्णपणे शेतीवरच निर्भर होते ते ह्या दुष्काळाच्या कचाट्यात खूप  वाईट सापडले.पावसा अभावी नद्या ,नाले , झरे , विहिरी  सुकल्या  , जमीन कोरडी पडली . अन्न नाही , पाणी नाही , प्राण्यांना द्यायला गवत नाही अशी परिस्तिति.  त्यात वरून सूर्याचे खालून जमिनीचे रणरणत्या निखार्यागत चटके. हळू हळू प्राणी लोकं मारू लागले.पाण्याच्या एका थेंबा साठी एका अन्नाच्या घासासाठी चोर्या दरोडे पडू लागले. गावची लोकं बिचारी हवालदिल झालेली .
शेवटी गावच्या जाणत्या लोकांनी गावातील देवळाच्या पुजार्याला विनंती केली दुष्काळ जाण्यासाठी आणि वर्षा वृष्टी होण्यासाठी काहीतरी दैवी उपचार करावे . पुजारी ब्राम्हणाने सांगितले कि उद्या सर्व गावकर्यांनी मंदिराच्या प्रांगणात जमावे . आपण सर्व मिळून परमेश्वराची प्रार्थना करूयात , पाउस नक्की पडेल व दुष्काळ मिटेल .
दुसऱ्या  दिवशी सांगितल्या प्रमाणे सगळे गावकरी देवळाच्या प्रांगणात जमले .एक गरीब गावकरी जो जरा उशिरा पोचला होता त्याचाकडे सर्व अचंब्याने पाहू लागले . जणू काही विचित्र देखावा पाहावा तसे . त्या गावकर्याने सोबत छत्री आणलेली होती .रणरणत्या उन्हात , पाउसचे एक हि चिन्ह किंवा ढग नसताना ह्या वेड्याने छत्री आणली हे पाहून सर्व गावकरी हसून जणू त्याची टर खेचू लागले .दृश्य होते हि मोठे विचित्र .पाउस नाही , पाउसाचा थेंब नाही आणि हा आपला आला छत्री घेऊन ! असो .
प्रार्थनेचा कार्यक्रम यथासांग पार पडला सर्व आपापल्या घरी जाण्यास निघाले.कुतूहलाने कुत्सित पणे काही लोकांनी त्याला छत्री आणल्या बद्दल विचारले .
"आर  वेड्या , पाउसाचा मौसम नाई , पाउसचे चिन्ह कुणीकडे दिसत नाई , आणि तुरे मारे छत्री घेऊन आलास . कश्या पाई ?
तो गावकरी म्हणाला  " लोकांनु , देव देतो नि देवच घेतो . मला खात्री हाय कि देव आपली प्रार्थना ऐकेल आनी मोप पाउस पडल , देवाच्या करणीने दुष्काळ मिटल ."
लोकं त्याच्यावर हसायला लागले, त्याला वेडाऊ लागले  , त्यांना दिसत होते ते रणरणते उन जे आजूनही अंगाला चटके देत होते .त्याची श्रद्धा विश्वास कोणालाही दिसत नव्हता .
आणी अचानक , अघटीत घडले ...
सुसाट वारा वाहू लागला , काळे ढग जमू लागले , वीज कडाडली आणी धोधो पाउस पडू लागला . सर्व गावकरी विस्मयीत झाले , त्यांच्या कुत्सित नजरा पाणावल्या . त्यांचे डोळे उघडले .त्यांनी मान्य केले कि त्या एकट्या गावकर्याच्या भक्ती पूर्ण श्रद्धेने केलेल्या प्रार्थने मुळेच पाउस पडला . बाकी सर्व गावकरी फक्त नावाला जमले होते .

म्हणूनच भगवान श्री कृष्ण म्हणतात कि प्रत्येक कर्मात श्रद्धा असणे आवश्यक आहे .अश्रद्धेने केलेले कोणतेही कर्म फलत नाही . ना या लोकांत ना परलोकांत

Thursday 10 April 2014

सद्गुरु बद्दल एक सुंदर दार्शनिक कथा

एकदा ब्राह्मदेवाचे मानस पुत्र नारद मुनी , दुखी: कष्टी होवून गप्प बसले होते .
ब्रह्मदेवांनी त्यांना विचारले 'पुत्रा तू इतका कष्टी का दिसतोस ?'
नारद म्हणाले ' पिताश्री मी सद्गुरूंच्या शोधात आहे ,पण मी जाणत नाही कि सद्गुरु कसे असतात त्या मुले मी  दुखी: कष्टी झालो आहे . मी सर्व वेदांत , १८ पुराणांत , ६४ कलांत पारंगत असा आहे तरी हि मी सद्गुरु कसे असतात हे जाणत नाही !ब्रह्मदेव म्हणाले ' बस इतकेच ? फार सोपे आहे ते . तू असे कर पृथ्वीतलावर जा . तिथे सहस्त्रगुण राजाच्या महालात एक कोळी आपे जाले विनात आहे .तो तुझ्या प्रश्नाचे उत्तर तुला देयील .
नारद मुनी आनंदानी त्या कोळ्या पाशी जाऊन पोचले . त्यांनी त्या कोळ्याला अत्यंत विनयाने विचारले '  उर्नानाभा अष्टपादा , सद्गुरु कसे ओळखावे ते कसे दिसतात हे  मला समजावण्याची आपण कृपा करावी '. कोळ्याने नारद मुनींकडे एक कटाक्ष टाकला बोलण्यासाठी मुख उघडण्याच्या आतच तो मृत झाला ! नारद मुनींना खूप वाईट वाटले परतून त्यांनी सर्व वृतांत आपल्या पित्यास सांगितला.  ब्रह्मदेव म्हणाले ' काही काळजी करू नकोस पुत्रा! सहस्त्रगुण राजाच्या गोशालेत नुकतीच एक गाय  व्याणार आहे . तू तिथे जा त्या नवजात पाडसाला तुझा प्रश्न विचार .ते तुझ्या प्रश्नाचे उत्तर देयील . नारद पुन्हा पृथ्वीतलावर सहस्त्रगुण राजाच्या गोशालेत आले . तिथे एक गाय एका पाडसाला जन्म देत होती . जन्मताच पाडस उठून उभे राहिले . नारद मुनींनी त्या पाडसाला पुन्हा तो प्रश्न हात जोडून विचारला , पाडसाने एक कटाक्ष नारद मुनींन टाकला काही बोलण्यासाठी मुख उघडण्या आत ते मृत झाले !नारद मुनी काहीतरी शाप लागण्याच्या भीतीने घाबरून गेले दुखी: मानाने पुन्हा परतले . त्यांनी सर्व वृतांत आपल्या पित्याला सांगितला . कोळी आणि पाडस माझे मुख पाहताच माझ्या प्रश्नाचे उत्तर देण्या आगोदरच मृत झाले .मी इतका का वाईट आहे कि ती दोघे माझ्हे मुख पाहता क्षणीच मृत झाली ? ब्रह्मदेवांनी नारद मुनींना काळजी करण्याचे आश्वासन दिले म्हणाले ' नारदा सहस्त्रगुण राजाची राणी एका सुंदर मुलाला लवकरच जन्म देणार आहे तेव्हा तू तिथे जा , ते मुल तुझ्या प्रश्नाचे  उत्तर तुला नक्की देयील '.नारद मुनी सहस्त्रगुण राजा कडे गेले . राजाने त्यांचा आदरसत्कार केला म्हणाला ' मुनी मला नुकतीच पुत्र prapti झाली आहे तेव्हा तुम्ही त्याला येवून आशीर्वाद द्यावा ' नारद मुनींना घेवून तो आपल्या महालात गेला . त्या नवजात बालकाला पाहताच जड अंतकरणाने त्याला आपला प्रश्न विचारला . ते नवजात बालक बोलू लागले  ' श्रेष्ट नारद मुनी ! आपण मला ओळखले नाही का ? मी तोच कोळी ! माझ्या आयुष्याच्या अन्त्क्षणी तुम्ही मला दर्शन दिले मी कोळ्याच्या  वोनीतून वरच्या योनीत जन्म घेतला एका गायीच्या पोटी पाडस म्हणून जन्माला आलो ! माझे आहो भाग्य की जन्मताच मला तुमचे दर्शन झाले तत्क्षणी मी त्या योनीतून मुक्त होवून एका राजकुळात मनुष्य रूपाने जन्म घेतला .तुमची परम कृपा की इथेही तुम्ही मला दर्शन दिलेत आपल्या कृपेने आता मी मोक्ष पावून या जन्म मरणाच्या बंधनातून कायमचा मुक्त होत आहे '. असे म्हणून ते बालक तत्क्षणीच मृत झाले .

गोष्टीचे तात्पर्य :
सद्गुरु हे शुद्ध चैतन्य रूप असतात , त्यांच्या एका कृपाकटाक्षात सर्व पापांना संस्कारांना जाळून मोक्ष देण्याची  ताकद असते .

ध्यान मुलम गुरुर मूर्ती
पूजा मुलम गुरुर पदम
मंत्र मुलम गुरुर वाक्यं
मोक्ष मुलम गुरुर कृपा .
श्री सद्गुरुवे नमः
श्री चैतन्य सद्गुरु गिरीशनाथाय नमः