Total Pageviews

Showing posts with label अध्यात्मिक अनुभवकथन. Show all posts
Showing posts with label अध्यात्मिक अनुभवकथन. Show all posts

Wednesday, 18 June 2025

मानस – १० वर्षांनी पूर्णत्वाची भेट


१० वर्षांपूर्वी एका सकाळी, सुखासनात बसून मी एक नीलविवर पाहिलं होतं.त्या ध्यानात मी एक सरोवर पाहिलंत्याच्या पाण्यात निळे गोलक, वर सात तेजवलय, आणि पार्श्वभूमीला एक शुभ्र हिमशिखर.तो एक *"दृश्य-निदर्शनाचा"* अनुभव होताअस्पष्ट, तरी खरा.

 

आज, १० वर्षांनी मी मानस सरोवराच्या काठावर उभा आहे.या दहा वर्षात आयुष्यात बरेच काही घडून गेले आणि कित्येक अनुभव येऊन गेले. काही गोड काही वाईटही. पण त्याची चर्चा पुढे कधीतरी . आज मात्र या मानस सरोवराची आणि माझी गोष्ट मी कथन करणार आहे .

 

पाठीवरचा त्रिकूट थकलाय, पण मन शांत, निःशब्द आणि तयारआहे.सहप्रवासी लांब गेले आहेत, मी एकटाच इथं उरलो आहे.हवा विरळ आहे, पण प्रत्येक श्वासा सरशी अंतरंगात काही तरी नवं घडत आहे. मी वाळूत खाली टेकलो ,डोळे मिटले आणि तोच प्रकाश परत आला.

 

डोळे उघडतो तर शरीर थरथरले , अधर विलगच राहिले . शरीरावर रोमांच दाटले .समोर दहा वर्षां पूर्वेचे तेच दृश्य प्रत्यक्षात होते .तेच निळसर पाणी, त्यावर निथळणारी शांतता, आणि समोरचं शुभ्र हिमशिखर.अगदी जसं ध्यानात पाहिलं होतंअगदी तसं. तेव्हा पाहिलं नव्हतं पण अनुभवलंहोतं.क्षणभर माझ्या अंगावर काटा आला .हे दृश्य माझं स्वप्न नव्हतं, हे उमगून आलं

 

माझे डोळे पाणावले . मी गुडघे टेकून बसलो .संपूर्ण वातावरण नीरव. फक्त वारा काय तो वाहत होता .त्या निळ्या सरोवरात आता हलकीशी लहर उठते.आणि सरोवराच्या मधोमध,माझ्या दृष्टिपथात पुन्हा तेच सात निळे गोलक तरंगताना दिसतात.

 

ते गोलक मला पुन्हा बोलावत आहेत.माझा संपूर्ण अस्तित्व शरीरातच आहे, पण माझी ओळख मात्र पाण्याकडे ओढली जाते आहे.मी उठतो, टोकाला जातो, आणि दोन्ही हात जोडून पाण्यात वाकतो.

 

क्षणभर विचार येतोमी आत जाईन तर परत येईल का?”

 

मग दुसऱ्याच क्षणी उत्तर येतं

 

"जेमी आत जातं तेच खरंमीअसतं. बाकीचं सगळं परत यायचंच नसतं.”

 

मी पाण्यात उतरतो.पाणी निथळतं, गारसरतं,पण त्यात भीती नाही.एक छान उब आहे .त्या सात गोलकांच्या दिशेने मी पोहतोअगदी मध्यभागी पोहोचल्यावर काही प्रकाशलहरी झुळझुळतात

आणि त्या प्रकाशातते पुनःप्रकट होतात.

 

समोर महाराज उभे आहेत !!!!!! खरंच !!!!!!!!!

हो,माझे सद्गुरू.

ज्यांच्या तसबिरीला मी १० वर्षं नमस्कार करत आलोतेच

ते आज माझ्यासमोर उभे आहेत! कपाळावर चंदन, मुखकमलावर मिश्किल हास्य.काहीही बोलत नाहीत,फक्त हात पुढे करतात. मी माझा हात पुढे करून त्याच्या हातात देतो. हात हातात देताच मी ही महाराजां सारखाच दिसू लागतो . महाराजांना लपवून मला दाखवला तर कोणी ही संशय घेतला नसता इतके साम्य आमच्यात होते . काही कळण्या पलीकडे होते आणि काही कळावे ही इच्छा ही नव्हती . हे क्षण असेच अविरत राहावे असे मात्र राहून राहून वाटत होतं.कोठूनतरी एक आवाज येत होता ......

 

हेच आहे तुझं पूर्ण रूप”.

प्रकाशही आहे, सावलीही आहे. ध्यानही आहे, अनुभवही. शब्दही आहेत, पण आता मौनात विरून गेले आहेत.

मी तू आणि तू मी आहे , कोणते ही द्वैत आता उरले नाही ”. असे म्हणून महाराज माझ्यात सामावतात .

मी पुन्हा डोळे उघडतो.मानस सरोवर शांत आहे.गोलक गेले आहेत.हवा थंड आहे आणि माझं अंतरंग कोऱं आहे, पण पूर्ण आहे.मी मागे वळतो.सहप्रवासी पुन्हा दिसतात.मी त्यांच्यात सामील होतो

पण आता 'मी' बदललोय.

मी गेलो नव्हतो

मी परतआलोय.

 

"जेव्हा ध्यानात पाहिलेलं वास्तवात प्रकटतं,तेव्हा शब्द नाहीसे होतातआणि उरतं फक्त अनुभवाचं तेज

 

अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।

 

अजय सरदेसाई (मेघ)

मानस सरोवर, तिबेट

गुरुवार, तारीख : ??/??/??  वेळ : ??:??


कैलास मानसरोवर एक अनुभव =दिवस पाचवा (शेवटचा) – निर्विकल्पता


आज पहाटे वेगळंच काही घडलं.मी उठलो, पण सुखासनात बसण्याआधीच मनाच्या गाभ्यात एक निर्वाणीची जाणीव झाली.जणू आता ध्यान ही कृती उरलीच नव्हती, ती एक स्थिती बनली होतीसहज, स्वाभाविक, आणि आपली.

मी डोळे मिटले.पण आज कसलीच दृश्यं आली नाहीत.ना सरोवर, ना गोलक, ना सावली.
फक्त एक निर्वर्ण शांत प्रकाश
ज्यात शब्द विरघळत होते,
आवाज विरत होते,
मग विचारही.

आणि मग एकअवर्णनीय शांतता हळूच उतरली.तिच्यात शब्दांचं अस्तित्वच नव्हतं.तिथे मी होतो,पण मी आहे याचीही जाणीव नव्हती.


हेच का निर्विकल्प होणे?

हीच का समाधी?
की हेच स्वतःच्या अस्तित्वाचं सर्वात खऱ्या अर्थाने लोपण ?

त्या क्षणी, कुठलाही अनुभव मी अनुभवतो असं वाटेना
फक्त अनुभव उरला होता.
ते शब्दात येत नाही, पण त्यात पूर्णता आहे.

 

हळूच डोळे उघडले.आकाश बाहेर मंद उजळत होतं.घरातले आवाज, पक्ष्यांचा किलबिलाट, आणि स्वयंपाकघरातून येणारा हलका खारवट वास
सगळं तसंच होतंपण नव्यासारखं वाटत होतं.


मी उभा राहिलो.महाराजांच्या तसबिरीपाशी गेलो.आज त्यांना काही सांगावं असं वाटलं नाही


कारण आतासांगण्यासारखं काही उरलं नव्हतं.’


फक्त डोळे मिटलेआणि मनातलं मौन त्यांच्या पादांजवळ ठेवून आलो.

 

या पाच दिवसांत मी कुणाच्या भेटीला गेलो नव्हतो.कोणीतरी मला भेटायला आला नव्हता.पण "मी" स्वतःला भेटत होतोटप्प्याटप्प्याने.


या प्रवासात मी

  • माझा प्रकाश पाहिला,
  • माझी सावली पाहिली,
  • माझं मौन ऐकलं,
  • आणि शेवटीमाझ्या पलीकडचं काहीतरी अनुभवलं.

हा अनुभव म्हणजे कथा नाही,तो एक घटनामुक्त सत्य आहे,ज्याचं ठाव घेताना, आपण स्वतः विरघळतो – शब्दांत, शरीरात, स्मृतींत

आणि जे उरतं ते म्हणजे


शुद्ध अस्तित्व. बोलणारं. भेदणारं. आणि संपणारं.

 

अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।


अजय सरदेसाई (मेघ)
बुधवार, १८/०६ /२०२५  –  २२:२० hrs